

Yogi Adityanath Government Changes Names of Two Villages in UP
sakal
उत्तर प्रदेशात लवकरच पंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील दोन ग्रामपंचायतींच्या नावांत बदल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्थानिक लोकांची श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.