

Understanding Annamaya Kosha in Child Development
sakal
मृदुला अडावदकर( सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ )
नव्या वाटा
बालकांचा ‘पंचकोशात्मक’ विकास ही संकल्पना मध्यभागी ठेवून त्या भोवती त्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ध्येये, उद्दिष्टे यांची वेगवेगळ्या क्षेत्रानुसार मांडणी केलेली आहे. ‘शरीर आद्यम खलु धर्म साधनम।’ असं म्हटलं आहे. आपल्या वाट्याला आलेलं कोणतंही कर्तव्य पूर्ण करायचं असेल, तर आपल्याला मिळालेलं शरीर आरोग्यपूर्ण राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यानुसार बालकाच्या जन्मानंतर सर्वांत महत्त्वाचा विकासाचा टप्पा म्हणजे त्याचा अन्नमय कोश. यामध्ये प्रत्यक्ष दिसणारे शरीर त्याचे अवयव तसेच रक्त मांस इत्यादी धातू म्हणजेच शरीरातल्या वेगवेगळ्या उती निरोगी आणि बलवान होण्याला महत्त्व दिलेलं आहे. त्यासाठी ‘युक्ताहार विहार’ हे व्रत तर सर्व विद्यार्थ्यांनाच घ्यावं लागतं. म्हणजे मिळेल तो आहार योग्य प्रमाणात घेणं.