- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आयुष्यातील महत्त्वाचा पैलू म्हणजे एकलक्षता. उंच शिखर गाठायचे असल्यास त्यावर १०० टक्के लक्ष आणि आपली ऊर्जा केंद्रित करणे गरजेचे आहे. उठता, बसता, खाता-पिता आपण आपल्या अंतिम लक्ष्याविषयी विचार केल्यावरच ध्येय साध्य होऊ शकते. आपले काम, मग तो अभ्यास असो, व्यवसाय असो किंवा नोकरी असो- तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे नाकारून चालणार नाही.