

Batenge to katenge: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला होता. आजकाल ही घोषणा देशभर चर्चेचा विषय बनली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील एनडीएमध्ये विरोध होताना दिसत आहे.
या घोषणेवर आक्षेप नोंदवणाऱ्यांमध्ये अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण, भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांसारखे बडे नेत्यांचा समावेश आहे. यामुळे हा नारा येताच महाराष्ट्रात बॅकफूटवर गेला आहे.