दक्षिण भारतात लोक 'केळीच्या पानावर' का जेवतात ? जाणून घ्या यामागचं विज्ञान !

फक्त संस्कृती नाही, तर आरोग्यासाठीही महत्व ; केळीच्या पानावर गरम जेवण वाढल्याने शरीराला मिळतात 'हे' थक्क करणारे फायदे..
The Surprising Benefits of Eating on Banana Leaves

The Surprising Benefits of Eating on Banana Leaves

Updated on

दक्षिण भारतात आजही हॉटेल असो किंवा घर, केळीच्या पानावर जेवण्याची परंपरा मोठ्या अभिमानाने पाळली जाते. उत्तर भारतातही पूर्वी पंगतींमध्ये केळीची पाने वापरली जायची. केळीच्या पानावर जेवणे ही फक्त एक जुनी परंपरा नसून, त्यामागे प्रगत विज्ञान आणि आयुर्वेदाचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या, स्टील किंवा प्लास्टिकच्या प्लेट्स सोडून केळीच्या पानावर का जेवले पाहिजे.

२ हजार वर्षांचा इतिहास आणि संस्कृती

दक्षिण भारतातील 'संगम साहित्यात' (सुमारे २००० वर्षांपूर्वीचे साहित्य) केळीच्या पानावर जेवण्याचा उल्लेख येतो. सनातन परंपरेत याला शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहे. केळीच्या पानावर सर्वांनी एकत्र जमिनीवर बसून जेवणे हे नम्रता आणि समानतेचे प्रतीक मानले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com