

Road Potholes
sakal
मिरज-तासगाव ते विटा हा महत्त्वाचा राज्य मार्ग ५२ किलोमीटरचा असून आज अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात अडकून मृत्यूचा सापळा बनला आहे. हजारो वाहनांची वाहतूक असलेल्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर ९० मोठे खड्डे जीवघेणे बनले आहेत. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे रोज जीव मुठीत धरून ये-जा करण्यासारखे आहे.