
मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी सात वाजता सुरू करण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, यास मानाच्या गणपती मंडळांनी विरोध केल्याने पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी साडेदहालाच मिरवणूक सुरू होईल, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी स्पष्ट केले.