दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडा

Terrorist
Terrorist

मेलबर्न - दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे आवश्‍यक असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. 

येथे आयोजित केलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या विशेष परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी भारताची बाजू मांडली. ‘दहशतवादाला कोणत्याही प्रकारे थारा देणे चुकीचे आहे. दहशतवादाबाबत संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावांमधून फाटे काढत काही सदस्य देश दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देतात. अशा देशांविरोधात इतर सर्व देशांनी एकत्रित कारवाई करावी,’ असे रेड्डी या परिषदेतील उद्‌घाटनाच्या सत्रात म्हणाले. या परिषदेला ६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. लष्करे तैयबा, जैशे महंमद, हिज्बुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ देत असल्याचा पाकिस्तानवर आरोप आहे. 

रेड्डी म्हणाले, ‘‘अल कायदा आणि ‘इसिस’ अजून सक्रीय आहेत. त्यामुळे दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. दहशतवाद हा विकासासमोरील सर्वांत मोठा शत्रू आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com