Loksabha 2019 : भाजप उमेदवारच म्हणतो, जिन्नांना पंतप्रधान केले असते तर...

Loksabha 2019 : भाजप उमेदवारच म्हणतो, जिन्नांना पंतप्रधान केले असते तर...

नवी दिल्ली : मोहम्मद अली जिन्ना एक वकील आणि विद्वान व्यक्ती होते. जर त्यावेळी निर्णय घेतला असता तर आपले पंतप्रधान मोहम्मद अली जिन्ना झाले असते. त्यांना पंतप्रधान केले असते तर देशाचे तुकडे झाले नसते, असे वक्तव्य भाजपचे उमेदवार गुमानसिंह डामोर यांनी केले.

डामोर यांना भाजपकडून मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. जिन्ना यांच्याबाबतच्या वक्तव्याचे वृत्त आज तकने दिले आहे. यामध्ये डामोर यांनी सांगितले, की स्वातंत्र्यावेळी जर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदाचा आग्रह धरला नसता तर देशाचे दोन तुकडे झाले नसते. मोहम्मद जिन्ना एक वकिल, एक विद्वान व्यक्ती होते. जर त्यावेळी निर्णय घेतला असता तर आपल्या देशाचे पंतप्रधान मोहम्मद अली जिन्ना बनले असते. भारत देशाचे तुकडे करण्यासाठी फक्त काँग्रेस पक्ष जबाबदार. 

तसेच डामोर पुढे म्हणाले, 1942 मध्ये जेव्हा भारत छोडो आंदोलन झाले होते. तेव्हा पंतप्रधानपदासाठी अनेकांना दावेदारी केली होती. काँग्रेसमध्ये अनेकांची इच्छा होती की नेहरू पंतप्रधान बनावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com