Pakistan: जगाचे डोळे उघडणारे सत्य आलं समोर! वाजपेयींचे नाव घेत नवाज शरीफांनी दिली मोठी कबुली

Pakistan former pm Nawaz Sharif: नवाज शरीफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी २१ फेब्रुवारी १९९९ मध्ये 'लाहोर घोषणा' करारावर स्वाक्षरी केली होती.
Nawaz Sharif
Nawaz Sharif

Islamabad (Pakistan): पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. १९९९ मध्ये पाकिस्तानने भारतासोबतच्या शांतता कराराचे उल्लंघन केले याची कबुली त्यांनी मंगळवारी दिली आहे. पक्षाच्या एका बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

२८ मे १९९८ रोजी पाकिस्तानने पाच न्यूक्लिअर टेस्ट केल्या. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी याठिकाणी आले आणि त्यांनी आमच्यासोबत करार केला. पण, त्या कराराचे आम्ही उल्लंघन केले. ती आमची चूक होती, असं नवाज शरीफ म्हणाले आहेत.

Nawaz Sharif
Pakistan: पाकिस्तानमध्ये माजी सरन्यायाधीशांच्या घरावर हल्ला; नवाज शरीफांना ठरवलं होतं अपात्र!

नवाज शरीफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी २१ फेब्रुवारी १९९९ मध्ये 'लाहोर घोषणा' करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्ग दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थिरतेसाठी प्रयत्न केले जाणार होते. पण, करारावर स्वाक्षरी होताच पाकिस्तानच्या सैन्याने भारतात घुसखोरी केली होती. जम्मू आणि काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात पाकिस्तान सैन्य आले होते. त्यामुळे कारगिल युद्ध घडले.

Nawaz Sharif
Pakistan Cricket : भिकेला लागलेल्या पाकिस्तानमध्ये खायचे वांदे अन् क्रिकेटर आझम खान पुसतोय नोटांनी घाम; Video व्हायरल

पक्षाच्या सर्वसाधारण सभेत नवाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, 'अमेरिकेकडून तीव्र दबाव असताना देखील पाकिस्तानने न्यूक्लिअर टेस्ट घडवून आणल्या. अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी न्यूक्लिअर टेस्ट न करण्यासाठी ५ अब्ज डॉलरची ऑफर केली होती पण, मी ती नाकारली.'

माझ्या पदावर इम्रान खान बसले असते तर त्यांनी क्लिंटन यांची ऑफर स्वीकारली असती, असा दावा शरीफ यांनी केला. तसेच, पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश साकिब निसार यांनी २०१७ मध्ये एका चुकीच्या प्रकरणात मला पंतप्रधान पदावरुन हटवलं, असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, कोर्टाने शरीफ यांना ६ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी बंदी घातली होती. त्यानंतर ते लंडनमध्ये पसार झाले होते. फेब्रुवारीमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पाकिस्तानमध्ये परत आले होते. त्यांच्या पक्षाला देशात चांगले यश मिळाले असून आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com