लंडन - पहलगाम हल्ल्यात आमचा हात नसल्याचा दावा पाकिस्तान सरकार करत असले तरी या देशाच्या संरक्षणमंत्र्यांनीच दिलेल्या कबुलीमुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले. तीस वर्षांपासून पाश्चिमात्य देशांच्या सांगण्यावरून दहशतवादी संघटनांना पाठबळ, प्रशिक्षण आणि पैसा देण्याचे घाणेरडे काम करत आहोत, असे या देशाचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. या चुकीचा पाकिस्तानला प्रचंड फटका बसल्याचेही त्यांनी मान्य केले.