India-Russia: भारत शक्तीशाली देश, मोदींच्या नेतृत्वात अधिक मजबूत होतोय; पुतिन यांनी केलं कौतुक
नवी दिल्ली- मॉस्को आणि नवी दिल्लीमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न निरर्थक आहे. पश्चिमी देश यात यशस्वी होणार नाहीत. भारत आपल्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने स्वतंत्रपणे निर्णय घेईल, असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले. सोची येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
आपले म्हणणं न ऐकणाऱ्या देशांना पश्चिमी देश शत्रू ठरवतात. आपली एकाधिकारशाही दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न पश्चिमी देश दुसऱ्या देशांवर करत असतात. सगळेच देश सध्या धोक्यात आहेत. भारताचाही यात समावेश आहे. पण, भारतीय नेतृत्व आपल्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत आहे, असं पुतिन म्हणाले.
भारत हा एक सार्वभौम देश आहे. त्यामुळे तो आपले निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतो. भारताला रशियापासून दूर करण्याचा प्रयत्न निरर्थक आहे, असं पुतिन म्हणाले. पश्चिम देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर भारताने सवलतीच्या दरात रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन पश्चिम देशांनी भारतावर टीका केली होती.
व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांचेही कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत देश दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे, असं ते म्हणाले. भारताची लोकसंख्या १.५ अब्ज आहे. ७ टक्के आर्थिक विकास दर आहे. त्यामुळे भारत हा एक शक्तीशाली आणि प्रचंड देश आहे. आणि पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात तो अधिक बलशाली होतोय, असं ते म्हणाले.
भारत हा जगातील प्रत्येक भागात आपला ठसा उमटवत आहे, असं ते म्हणाले आहेत. पुतिन यांनी भारतात आयोजित करण्यात आलेल्या जी-२० परिषदेला दांडी मारली होती. त्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात होते. पण, त्यांनी भारताबाबत केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत होत असल्याचं दिसतंय. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.