इनर इंजिनिअरिंग : व्यवहारातून निवृत्तीसाठी...

Sadguru
Sadguru

ईश्वराचा शोध घेण्यासाठी आपण सांसारिक व्यवहारांकडं दुर्लक्ष करावं का? तरीही सांसारिक व्यवहारांमधून तुम्ही कसे काय माघार घेऊ शकता? संसारिक गोष्टींची तुमची कल्पना काय आहे, यावर हे सगळं अवलंबून आहे. तुमचा स्वयंपाक तयार करणे सांसारिक काम आहे का? होय. तुमचे कपडे धुणे सांसारिक काम आहे का? होय. आपल्याला ही सांसारिक कामं करावी लागणारच, नाहीतर तुम्ही कसं काय जगू शकाल?

कोणत्या प्रकारचे सांसारिक व्यवहार करायचे ही ज्याची त्याची वैयक्तिक निवड आहे. सर्वांनी राजकारणात गेलेच पाहिजे असं नाही.अगदी नित्यनेमाच्या सामाजिक परिस्थितींमध्येही, कोणी राजकारणात आहे, कोणी क्लार्क आहे, कोणी एक मोठा उद्योग चालवत आहे, कोणी फरशी पुसण्याचं काम करत आहे. हे सगळेजण सांसारिक व्यवहार करत आहेत. म्हणजे सांसारिक व्यवहारांतून तुम्ही पूर्णपणे निवृत्त होऊ नाही शकत. प्रत्येकाला हा अधिकार आहे, की त्यांना कोणत्या प्रकारचे सांसारिक व्यवहार करायचे आहेत आणि किती प्रमाणात करायचे आहेत. ज्यांना त्यांच्याबाबतीत काय चाललेलं आहे याची कल्पना नसते आणि जे इतर लोक काय करत आहेत त्याची नक्कल करण्यात गुंतलेले आहेत, फक्त अशी माणसंच याबाबतीत तक्रार करत असतात. स्वत:ला हवं त्या गोष्टी करण्यासाठी त्यांच्याजवळ तेवढी जागरूकता आणि बुद्धिमत्ता नसते. असे लोक आध्यात्मिक लोकांबद्दल नेहमी तक्रार करत असतात; ‘‘हे लोक बेजबाबदार आहेत. ते सांसारिक व्यवहारात रस घेत नाहीत, ते फक्त स्वत:च्याच व्यवहारात गुंतलेले असतात, वगैरे. 

जो माणूस स्वत:च्या घरात कार्य करतो किंवा ऑफिसमध्ये काम करत आहे, तो सुद्धा फक्त स्वत:चेच व्यवहार करत आहे. त्याला काही जगाच्या कल्याणामध्ये रस नाही. स्वतःचा खरा व्यवहार काय हे सुद्धा त्याला माहीत नाही आणि तो अशा गुंत्यात अडकला आहे, की त्याला आता त्यातून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा त्याला माहीत नाही. एखादी व्यक्ती त्याचं आयुष्य त्यांना हवं तसं, त्यांना जमेल तसं, सहज हाताळत असल्यास, हेच लोक ज्यांनी त्यांची आयुष्यं सैरभैर आणि बाह्य परिस्थितींचे गुलाम होऊन अडकून पडले आहेत, त्यांना यांचा मत्सर वाटतो. ते नेहमी तक्रार करत असतात.

जग सध्या ज्या प्रकारे वाटचाल करत आहे आणि ज्या अगणित कार्यकृतीत लोकं आज गुंतलेले आहेत, जर खूप सारे लोक एवढ्या सगळ्या गोष्टी या ग्रहावर असेच करत राहीले तर, हा ग्रह पुढची दहा वर्षं सुद्धा टिकणार नाही. सुदैवानं ५०% लोक आळशी आहेत आणि राहिलेले ५०% अतिउद्योगी आहेत, ते जगाचा नाश करण्यात व्यग्र आहेत. जे लोक अतिरिक्त कार्यकृतींमधून माघार घेत आहेत ते कोणत्याही प्रकारे स्वत:ला किंवा समाजाला, पर्यावरणाला किंवा पृथ्वीला धोका पोचवत नाहीत. जे पूर्णपणे जागरूक न राहता व्यवहार करत आहेत, तेच खरोखर ह्या जगाचा नाश करत आहेत, ते काय करत आहेत हेच त्यांना माहीत नाही. फक्त आजूबाजूच्या लोकांचे अनुकरण करत, ते पुष्कळ व्यवहारांमध्ये सक्रिय झालेले दिसतात, इतरांपेक्षा अधिक सक्रिय झालेले दिसतात. हेच लोक या ग्रहाला जास्त हानी पोचवत आहेत, हेच लोक अवघ्या मानवतेला जागतिक विनाशाकडे घेऊन जात आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर सध्या, सर्वांत जबाबदारीची गोष्ट तुम्ही करू शकता, ती म्हणजे सांसारिक कार्यकृतींमधून जरा माघार घेणे, पण व्यवहारांमधून माघार घेणे. ही काही तितकी सोपी गोष्ट नाही, फक्त शांत बसून राहण्यासाठी पुष्कळ परिपक्वता लागते. ते तुम्ही आळशी किंवा बेजबाबदार असल्यास नाही होणार, ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही जागृत आणि सजग असता...

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com