

Are antibiotics good or bad for us?
esakal
Antibiotic Crisis: आजकाल लहानसं दुखणं असलं तरी आपण लगेच मेडिकलमध्ये जातो आणि स्वतःच्या मनानेच 'अँटिबायोटिक्स' (Antibiotics) गोळ्या आणून खातो. पण हीच सवय आता माणसाच्या अंगलट येऊ लागली आहे. भारतात दरवर्षी तब्बल ३ लाख लोकांचा मृत्यू हा 'अँटिबायोटिक्स रेझिस्टन्स' (औषधांना दाद न देणारे जिवाणू) मुळे होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०२५ मधील आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात आयसीएमआरच्या (ICMR) हवाल्याने या गंभीर धोक्याची जाणीव करून दिली होती. जर आपण वेळीच सुधारलो नाही, तर २०५० पर्यंत जगात सुमारे ३.९८ कोटी लोकांना यामुळे जीव गमवावा लागू शकतो, असा इशारा नवीन अभ्यासात देण्यात आला आहे.