Child Marriage Impact on Girl's Health
sakal
The Hidden Health Impact of Child Marriages: जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी व वाडा या ग्रामीण भागांमध्ये बालविवाहासारख्या अनिष्ट रूढी-परंपरा अजूनही कमी झालेल्या नाहीत. गेल्या पाच ते सहा वर्षात पाचशेहून अधिक बालविवाह झाल्याचे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले होते. बालविवाहामुळे कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यूसारखे गंभीर परिणाम समोर येत आहेत. जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत ४,२०० च्या जवळपास बालमृत्यू झालेले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यू मूदतपूर्व प्रसूती, कमी वजनाची बालके, श्वासोच्छ्रास कोंडून झाले आहेत.