Daily Bath Habit : रोज अंघोळ करणे गरजेचे आहे काय? तज्ज्ञांचं मत वाचून तुम्हीही अवाक व्हाल

पल्याला लहानपणापासूनच सांगितले गेले आहे की रोज आंघोळ करणे ही एक चांगली सवय आहे आणि ती आपल्याला ताजेतवाने ठेवते
Daily Bath Habit
Daily Bath Habitesakal

Daily Bath Habit : थंडीच्या दिवसांत अनेकांना अंघोळीचा कंटाळा येतो. जर तुम्हाला थंडीत आंघोळ करावीशी वाटत नसेल किंवा तुम्ही रोज आंघोळ करत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. हवामान काहीही असो, आपण रोज आंघोळ करतो, कारण आपल्याला लहानपणापासूनच सांगितले गेले आहे की रोज आंघोळ करणे ही एक चांगली सवय आहे आणि ती आपल्याला ताजेतवाने ठेवते.

याशिवाय आंघोळीचे इतरही अनेक फायदे आहेत. मात्र, आंघोळ केल्यावर जी फ्रेशनेस जाणवते, ती गोष्ट इतर कशात कुठे येते हेही खरे आहे. पण विज्ञान याविषयी काही वेगळेच मानते. रोज आंघोळीची ही सवय विज्ञान चांगली का मानत नाही ते जाणून घ्या...

रोज आंघोळ केल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे विज्ञान सांगते. त्याच वेळी, जगभरातील त्वचा विशेषज्ञ म्हणतात की थंडीत दररोज आंघोळ न करणे चांगले आहे, यामुळे आपली त्वचा सुरक्षित राहील. अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की त्वचेमध्ये स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता चांगली असते. जर तुम्हाला दररोज घाम येत नसेल, धूळ आणि मातीचा संपर्क येत नसेल, तर दररोज आंघोळ करणे आवश्यक नाही. (Health)

गरम पाण्याने अंघोळ केल्याने होणारे नुकसान

हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ केल्याने जास्त नुकसान होते. कारण यामुळे शरीरातील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी होते. नैसर्गिक तेल शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. शरीराला ओलावा ठेवताना ते एक अवरोधक म्हणून देखील कार्य करते. म्हणूनच हिवाळ्यात आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच आंघोळ करावी.

नखांसाठी हानिकारक

दररोज गरम पाण्याने आंघोळ करणे देखील नखांसाठी हानिकारक मानले जाते. कारण कालांतराने नखे पाणी शोषून घेतात. मग ते मऊ होतात आणि तुटतात. त्याच वेळी, नैसर्गिक तेल सोडल्यामुळे, ते कोरडे आणि कमकुवत होऊ लागतात. गरम पाणी त्यांची नैसर्गिक चमक आणि गुळगुळीतपणा काढून टाकू शकते.

त्वचेच्या संसर्गाचा धोका

कोलंबिया विद्यापीठातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञांच्या मते, "दैनंदिन आंघोळ केल्याने त्वचा कोरडी आणि कमकुवत होते. त्यामुळे संसर्गाचा धोका झपाट्याने वाढतो. त्यामुळे रोज आंघोळ करू नये."

रोज आंघोळ करावी का?

आंघोळीची सवय व्यक्तीची मनःस्थिती, तापमान, हवामान आणि सामाजिक दबाव यावर अधिक अवलंबून असते. आपल्या देशात धार्मिक कारणास्तव स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय येथे पाण्याची कमतरता नाही. मात्र, भारतात अनेक वेळा सामाजिक दबावामुळे आंघोळही आवश्यक होते.

Daily Bath Habit
Myths About Fat Women: वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये Infertility च्या समस्या अधिक; समज की गैरसमज?

भारतातील लोक अंघोळ करण्यात आघाडीवर आहेत

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारत, जपान आणि इंडोनेशियाचे लोक आंघोळीच्या बाबतीत जगात खूप पुढे आहेत. अनेक संशोधनांमध्ये असे समोर आले आहे की, दररोज आंघोळ केल्याने केवळ पाण्याचा अपव्यय होत नाही तर ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही हानिकारक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com