

Ganeshotsav, Ayurveda and the wisdom of mindful eating.
Sakal
डॉ. मालविका तांबे
घरोघरी गणरायांचे आगमन होणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात आपल्या लाडक्या गणपतीबाप्पांची पूजा करून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीगणेशांना बुद्धी आणि बलाची देवता मानले जाते. केवळ शारीरिक किंवा मानसिक बल पुरेसे नसते. संकटकाळी शारीरिक बलाचा उपयोग कोठे करावा आणि बुद्धीचा उपयोग कोठे करावा, याचा विचार करणे अपरिहार्य असते. या दोन्ही गोष्टी श्रीगणेशांच्या उपासनेतून साध्य होतात.