Health Care : फळे खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे पोषक तत्व मिळतात. फळे खाणे निरोगी आरोग्यासाठी आणि स्किन केअरसाठीही फार चांगले असते. असे म्हटले जाते की रिकाम्या पोटी फळे खाणे चांगले असते. पण तुम्हाला माहित आहे का की काही फळे सकाळी लवकर खाल्ल्याने म्हणजेच रिकाम्या पोटी खाल्ल्याने मोठे नुकसान होऊ शकते. रिकाम्या पोटी फळे खाल्ल्यास पोटाच्या समस्या निर्माण होतात. तेव्हा आज आपण असे कोणते फळ आहे जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो ते जाणून घेऊया.
सकाळी रिकाम्या पोटी कोणती फळे खाऊ नये?
सफरचंद
तज्ज्ञ दिवसभर सफरचंद खाण्याची शिफारस करतात, मात्र ते नेमके कोणत्या वेळी खावे याचीसुद्धा एक वेळ असावी. सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि ते रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. हाय फायबरमुळे सूज येणे, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी रिकाम्या पोटी सफरचंद खाणे टाळावे.
पपई
पपईमध्ये पपेैन नावाचे एंजाइम असते जे प्रथिने तोडण्यास मदत करते. पपई रिकाम्या पोटी खाल्ल्यास पपेनमुळे चिडचिड होऊ शकते. यामुळे तुमच्या पोटाच्या लेयरला नुकसान पोहोचू शकते. पचनसंस्थेशी संबंधित समस्या असल्यास काहीतरी खाल्ल्यानंतर पपई खाणे फायद्याचे असते.
आंबा
आंब्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते. रिकाम्या पोटी आंबे खाल्ल्यास त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. रिकाम्या पोटी आंबा खाल्ल्याने पोट फुलणे, गॅसची समस्या तसेच संधीवाताचा त्रास यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. (Fruits)
खरबूज
खरबूजमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि ते रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो. खरबूजमधील साखरेमुळे इन्सुलिनच्या पातळीत वाढ होऊ शकते, ज्यामुळे अस्वस्थता वाटणे आणि सूज येणे, गॅस आणि अपचन यांसारख्या पाचन समस्या देखील उद्भवू शकतात. (Health)
डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर अवलंबून असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.