Health Tips: 'या' टिप्स फॉलो करा, कामाच्या मधात तुम्हाला येणारा आळस आणि झोप आपोआप होईल दूर

आळस हा कधीही येऊ शकतो,आळस यायची ठराविक वेळ कधीत नसते, तो दिवसभरात कधीही कोणाला येऊ शकतो.
Laziness
LazinessEsakal

How To Overcome Laziness: आळस हा कधीही येऊ शकतो,आळस यायची ठराविक वेळ कधीत नसते तो दिवसभरात कधीही कोणाला येऊ शकतो. एकदा जर का आळस आला की त्यातून सुटका होणे कठीण होते. विशेष करून अभ्यास करताना किंवा ऑफिसचे काम करताना आळस जास्त येतो. आपण कितीही प्रयत्न केले तरी तो आळस लवकर जात नाही.

अशा प्रकारे आळस आला की आपण आपल्या कामापासून

डिस्ट्रेक्ट (Distract) होतो आणि आपण आपले काम निट करू शकत नाही.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा आळस आणि प्रचंड येणाऱ्या झोपेच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. चला तर मग बघू कोणत्या आहेत त्या टिप्स

Laziness
Health: Acidity दूर करण्यासाठी खास रामबाण उपाय

तेल मालिश करावी.

सतत येणारा आळस दूर करण्यासाठी रोज शरीराची तेलाची मालिश करावी. तेलाने शरीराला मालिश केल्याने थकवा आणि आळस दूर होतात आणि आपल्याला शरीराला आराम मिळतो. म्हणुन आळस आणि झोप दूर ठेवण्यासाठी दररोज शरीराची 10-20 मिनिटे मसाज करा, यामुळे तुमचा आळस आणि थकवा दूर होईल. केसांना तेल लावतानाही केसांना चांगलं तेल लावले पाहिजे.


सकाळी लवकर उठायची सवय लावावी.

जर तुम्ही लवकर उठलात तर आपोआप तुमचा दिवस हा आनंदाने भरलेला असेल. कारण सकाळच्या शुध्द हवेतून एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. आपल्या शास्त्रातही ब्रह्म मुहूर्तावर उठणे हे लाभदायक असल्याचे सांगितले आहे. सकाळी लवकर उठल्याने दिवसभर उर्जा राहते आणि तुम्ही फ्रेश राहता. यामुळे रात्री लवकर झोपावे,सकाळी लवकर उठावे कारण समजा तुमची रात्री योग्य झोप झाली नाही तर मग तुम्हाला दिवसा झोप येऊ शकते.

Laziness
Health News: केळी खाल्यामुळे खरचं रक्तदाब कमी होतो का? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत

सकाळी लवकर उठून योगासने करायची सवय लावावी.

सकाळी लवकर उठून योगासने करावीत. सकाळच्या शांत वातावरणात ध्यान करणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. सकाळच्या शुद्ध हवेत योगासने व व्यायाम केल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. ध्यानधारणा केल्याने कोणतेही काम करण्यात आळस येत नाही.

योग्य आहार घेणे.

आजकालच्या धकाधकीच्या जिवनात चुकीच्या खाण्याच्या सवयी देखील आळशीपणाचे कारण असु शकतात. सकस अन्न खाणाऱ्यांपेक्षा फास्ट फूड खाणारे लोक जास्त आळशी असतात. अशा चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे सुध्दा आळशीपणा येऊ शकतो. त्यामुळे जास्त फास्ट फूड खाणे आपण टाळले पाहिजे. जेवणाच्या चुकीच्या वेळेमुळे सुध्दा आळस आणि झोप येते, त्यामुळे योग्य वेळी योग्य आहार घ्यावा. रात्री झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com