

अनेक लोक निरोगी राहण्यासाठी सकाळी ५ वाजता उठून व्यायाम करतात. तसेच स्मूदी, पौष्टिक आहारावर भर देतात. पण निरोगी राहण्याची रहस्य हे सकाळच्या दिनचर्येप्रमाणेच संध्याकाळच्या दिनचर्येत देखील आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय भोजराज यांचा असा विश्वास आहे की आपण सूर्योदयाच्या धावपळीला जास्त महत्त्व देत आहोत आणि झोपण्याच्या वेळेच्या रीतींना कमी लेखत आहोत. त्यांच्या मते, रात्री तुम्ही कसे आराम करता यावर तुमचे शरीर खरोखरच बरे होत आहे की हळूहळू खराब होत आहे हे ठरवता येते.