Rising Temperatures
sakal
गणेशोत्सवाचे दिवस संपले की वेध लागतात नवरात्रीचे. या दरम्यान ऋतूबदलही होत असतो. वर्षा ऋतू संपून शरद ऋतूला सुरुवात होते त्यावेळी आसमंतात, वातावरणात बराच बदल होत असतो. पाऊस थांबतो, आकाश निरभ्र व्हायला लागते आणि जसजशी ढगांची चादर विरळ होते तसतशी सूर्याची प्रखरता जाणवायला लागते. हवेतला दमटपणा कमी होते, गारवा कमी होतो, त्याऐवजी प्रखर सूर्यकिरणांमुळे उष्णता वाढते आणि शरीरात साठलेल्या पित्ताचा प्रकोप होतो.