

"प्रेम पंख देणारं हवं की बेड्या घालणारं?" संत नामदेव महाराजांच्या अभंगातून उलगडले नातेसंबंधांतील मानसशास्त्र; सचिन महाराज पवार यांचे विश्लेषण.
Sakal
सचिन महाराज पवार
टोकाला गेलेल्या नातेसंबंधांमुळे अनेकांचं रोजचं जगणं कठीण झालं आहे. प्रेमाच्या नावाखाली निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत, अति-अधीनता आणि सततची असुरक्षितता यांमुळे माणूस आतून तुटत चालला आहे. अशा वेळी संत नामदेव महाराजांचा ‘बाईल आधीन होती जे कां नर...’ हा अभंग या समस्येच्या मुळाशी घेऊन जातो.
बाईल आधीन होती जे कां नर ।
ते म्हणों पामर श्वानरूपें ॥१॥