
डॉ. बालाजी तांबे
थंडी व शिशिर ऋतू हा सर्वांचाच अत्यंत प्रिय ऋतू. थंडीत मायेची, उबेची अधिक आवश्यकता असते. त्यामुळे थंडीत मायेच्या माणसांची अधिक आठवण येते.
केवळ उष्ण प्रदेशातील लोकांनाच नव्हे तर बर्फ पडणाऱ्या किंवा १२ महिने थंडी असणाऱ्या प्रदेशातील लोकांनाही उंच डोंगर व थंड वारे असलेल्या स्थळांचे आकर्षण असतेच. नवीन लग्नाचा आनंद व उत्साह जणू शरीरातील उष्णता वाढवत असावा. त्यामुळे लग्न झाल्या झाल्या लोकांना आठवण येते, थंड हवेच्या ठिकाणाची.