सद्गुरू : दुर्दैवाने, बहुतेक मानवांना स्वतःच्या आत खोलवर समाधान सापडत नसल्यामुळे, ते सतत वर्चस्वासाठी आसुसलेले असतात. जेव्हा सत्ता ही वर्चस्व गाजवण्याचे साधन बनते, तेव्हा ती कुरूप होते..पण आपण हे समजून घेतले पाहिजे, की सत्ता केवळ राजकीय किंवा आर्थिक नसते, सामर्थ्यशाली होण्याचे विविध मार्ग आहेत - प्रेम आणि करुणेचे सामर्थ्य, ध्यानाचे सामर्थ्य, आत्ममग्नतेचे सामर्थ्य, शरणागतीचे सामर्थ्य आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, माणूस असण्याचे सामर्थ्य. म्हणून, जर तुम्ही सत्तेच्या शोधात असाल, तर तुम्ही सत्तेच्या सर्व विविध पैलूंना समजून घेतले पाहिजे आणि अस्तित्वात राहण्याचा सर्वांत सामर्थ्यशाली मार्ग कोणता आहे हे पाहिले पाहिजे..सामर्थ्यवान असणे ही निर्मिती करण्याची एक शक्यता आहे - सामर्थ्याशिवाय काहीही निर्माण करता येत नाही. प्रत्येक माणूस सामर्थ्यवान असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण सामर्थ्यवान असण्याच्या विरुद्ध कमकुवतपणा आहे. काही जणांनी सत्तेचा गैरवापर केला म्हणून कमकुवतपणाचा गौरव केला जाऊ नये. सामर्थ्य म्हणजे भ्रष्टाचार नाही.जर मानवांत स्वतःच्या आत एक सखोल तृप्तीची भावना असेल आणि ते सर्वांच्या कल्याणासाठी काय निर्माण करू शकतात हे पाहत असतील, तर सामर्थ्य ही एक अद्भुत गोष्ट आहे. सामर्थ्यशाली असण्याचा अर्थ असा नाही, की तुमची दुसऱ्या कोणावर सत्ता असावी; तुम्ही केवळ तुमच्या अस्तित्वानेच सामर्थ्यशाली असू शकता..एखाद्याचे व्यक्तिमत्त्व जितके कमी असेल, तितके त्याचे अस्तित्व अधिक सामर्थ्यशाली बनते. हेच आध्यात्मिक साधनेचे सार आहे, की जर तुम्ही तुमचे व्यक्तिमत्त्व विलीन केले, तर तुमच्या जीवनाचे अस्तित्व खूप सामर्थ्यशाली बनते.जीवन ही एक सामर्थ्यशाली प्रक्रिया आहे. जर तुम्हाला ते परिपूर्ण बनवायचे असेल, तर तुम्हाला एक सामर्थ्यशाली व्यक्ती बनावे लागेल. जेव्हा व्यक्तिमत्त्वाच्या पलीकडचे तुमचे एक सामर्थ्यशाली अस्तित्व असते, तेव्हा ते असे ठसे उमटवू शकते जे कायमस्वरूपी राहतात. हेच भूतकाळातील आध्यात्मिक व्यक्तींचे सामर्थ्य होते..जरी ते हजारो वर्षांपूर्वी होऊन गेले असले, तरी त्यांचे कार्य आजही सुरू आहे, कारण जर तुम्ही तुमच्या शारीरिक सामर्थ्याचा वापर केला, तर तुमच्या कार्याचे एक ठरावीक आयुष्यमान असते. तुम्ही तुमच्या मनाच्या सामर्थ्याचा वापर केलात, तर तुमच्या कार्याचे आयुष्यमान खूप मोठे असते आणि जर तुम्ही तुमच्या अंतरात्म्याच्या सामर्थ्याचा वापर केला, तर तुमचे कार्य शाश्वत असते..म्हणून, सर्वांत चिरस्थायी सामर्थ्य म्हणजे आपल्या आत असलेल्या सामर्थ्याची जाणीव होणे. जेव्हा मी ‘आतले सामर्थ्य’ म्हणतो, तेव्हा मी त्या आयामाबद्दल बोलत आहे, जो तुमचे शरीर निर्माण होण्याचा मूळ आधार आहे, जो आयाम तुम्हाला आतून निर्माण करतो आणि तोच सृष्टीचा मूळ स्रोत आहे आणि तेच अंतिम सामर्थ्य आहे.एकदा का तुम्ही या सामर्थ्याचा शोध घेतला, एकदा का तुम्ही हे सामर्थ्य जाणले आणि त्याच्यापर्यंत पोहोचलात, की तुमच्या लक्षात येईल की, सामर्थ्य म्हणजे भ्रष्टाचार नाही, सामर्थ्य म्हणजे ईश्वरी तत्त्व आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.