पृथ्वीतत्त्वाचा संबंध असतो गंधाशी. जेथे गंध-वास-सुवास तेथे, पृथ्वीतत्त्वाचा वास. नाकाने मुख्यतः वास-सुगंध म्हणजेच पृथ्वीतत्त्वाचा स्वीकार होतो. देव देवता तर नुसत्या वासानेच अन्नग्रहण करतात.
पृथ्वी व पर्यायाने जलतत्त्व म्हणजेच कफदोष उत्पन्न झाला तर नाकास आपले कार्य करणे अवघड जाते. नाकाच्या पोकळीचा, आवाज व शब्दांना घाट तसेच गोडवा देण्यासही उपयोग होतो. म्हणून नाक भरले म्हणजे शब्द गेंगाणा होतो.