Breakup Day : बॉलीवूडची गोष्टच भारी, ब्रेकअपनंतरही जपली पक्की यारी; पहा कोण

बॉलीवूड सेलिब्रिटीजच्या खऱ्या आयुष्यातील या काही गोष्टी खरंच शिकण्यासारख्या आहेत
Breakup Day
Breakup Dayesakal
Updated on

Breakup Day : बॉलीवूडमधल्या फिल्मी सीन्सप्रमाणे खऱ्या आयुष्यातही अगदी फिल्मी जगण्याचा प्रयत्न बरेच लोक करतात. अगदी बॉलीवूडच्या रोमँटिक सीन्सपासून ते सेंटिमेंटल सीन्सपर्यंतचा सर्वसामांन्यांवर पडलेला प्रभाव तुम्ही स्वत:देखील कधीतरी अनुभवला असेलच. मात्र तुम्हाला माहितीये काय, बॉलीवूड सेलिब्रिटीजच्या खऱ्या आयुष्यातील या काही गोष्टी खरंच शिकण्यासारख्या आहेत.

करिना कपूर आणि शाहीद कपूर - पाच वर्षांचं रिलेशनशिप संपवल्यानंतर हे दोघे जवळजवळ सात वर्ष एकमेकांना भेटले नव्हते. मात्र 2014 मध्ये IIFA 2014 मध्ये जेव्हा करिना आयफाच्या स्टेजवर पोहोचली त्या वेळी शाहीद त्या शोला को होस्ट करत होता. त्यावेळी करिनाने खुद्द शाहीदला 'हॅलो' म्हटले. एवढेच नव्हे यानंतर ते दोघे 'उडता पंजाब' या मूव्हीमध्ये सुद्धा एकत्र दिसून आले. एका मुलाखतीत शाहीदने खुद्द या गोष्टीचा खुलासा केला होता की शाहीदने स्वत: करिनाचे नाव या मूव्हीसाठी सुचवले होते.
करिना कपूर आणि शाहीद कपूर - पाच वर्षांचं रिलेशनशिप संपवल्यानंतर हे दोघे जवळजवळ सात वर्ष एकमेकांना भेटले नव्हते. मात्र 2014 मध्ये IIFA 2014 मध्ये जेव्हा करिना आयफाच्या स्टेजवर पोहोचली त्या वेळी शाहीद त्या शोला को होस्ट करत होता. त्यावेळी करिनाने खुद्द शाहीदला 'हॅलो' म्हटले. एवढेच नव्हे यानंतर ते दोघे 'उडता पंजाब' या मूव्हीमध्ये सुद्धा एकत्र दिसून आले. एका मुलाखतीत शाहीदने खुद्द या गोष्टीचा खुलासा केला होता की शाहीदने स्वत: करिनाचे नाव या मूव्हीसाठी सुचवले होते.
अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग - "बँड बाजा बारात" या चित्रपाटाच्या शूटींगदरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि तेव्हापासून यांची प्रेमकहाणी सुरू झाली. यानंतर हे दोघे एकमेकांपासून लांब राहायचे. मात्र झोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' या मूव्हीत हे दोघे परत एकत्र आले. चित्रपटातील त्यांच्या कंफर्ट बिहेवियरमधून त्यांचं कधी काळी ब्रेकअप झालं असेल याची जाणीवसुद्धा प्रेक्षकांना झाली नाही.
अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग - "बँड बाजा बारात" या चित्रपाटाच्या शूटींगदरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि तेव्हापासून यांची प्रेमकहाणी सुरू झाली. यानंतर हे दोघे एकमेकांपासून लांब राहायचे. मात्र झोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' या मूव्हीत हे दोघे परत एकत्र आले. चित्रपटातील त्यांच्या कंफर्ट बिहेवियरमधून त्यांचं कधी काळी ब्रेकअप झालं असेल याची जाणीवसुद्धा प्रेक्षकांना झाली नाही.
रिलीजवेळी स्वत: रणवीरने खुलासा केला की, "चित्रपटाच्या शूटींगआधीपर्यंत आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो. मात्र शूटींगच्या तीन दिवसांआधी जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो तेव्हा जणू जुने मित्र एकमेकांना भेटल्याचे आम्हाला वाटले. अनुष्का थोडीही बदललेली नव्हती. आमच्यातील मैत्रीचं ते नातं काय असंच टीकून राहील"
रिलीजवेळी स्वत: रणवीरने खुलासा केला की, "चित्रपटाच्या शूटींगआधीपर्यंत आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो. मात्र शूटींगच्या तीन दिवसांआधी जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो तेव्हा जणू जुने मित्र एकमेकांना भेटल्याचे आम्हाला वाटले. अनुष्का थोडीही बदललेली नव्हती. आमच्यातील मैत्रीचं ते नातं काय असंच टीकून राहील"
कतरिना कैफ आणि सलमान खान - सलमान आणि कतरिना यांचं ब्रेकअप का झालं हे जरी अजून गुपित असलं तरी ते जवजवळ पाच वर्ष एकत्र होते.ब्रेकअप झालं असलं तरी कतरिना अजूनही सलमानची तितकीच चांगली मैत्री आहे. सलमानच्या जवळपास सगळ्याच पार्टीजमध्ये कतरिनाची हजेरी दिसून येते. सलमानची बहीण अर्पिता हिच्याशीसुद्धा कतरिनाचे जवळीक संबंध आहेत. यातून त्यांची मैत्री किती घट्ट आहे हे लक्षात येते
कतरिना कैफ आणि सलमान खान - सलमान आणि कतरिना यांचं ब्रेकअप का झालं हे जरी अजून गुपित असलं तरी ते जवजवळ पाच वर्ष एकत्र होते.ब्रेकअप झालं असलं तरी कतरिना अजूनही सलमानची तितकीच चांगली मैत्री आहे. सलमानच्या जवळपास सगळ्याच पार्टीजमध्ये कतरिनाची हजेरी दिसून येते. सलमानची बहीण अर्पिता हिच्याशीसुद्धा कतरिनाचे जवळीक संबंध आहेत. यातून त्यांची मैत्री किती घट्ट आहे हे लक्षात येते
दीपिका आणि रणबीर कपूर - दीपिका रणबीर कपूर जेव्हा वेगळे झालेत तेव्हा बरेच आरोप प्रत्यारोप झालेत. एका मुलाखतीत बोलताना रणबीरने याबाबत खुद्द कबूली दिली होती. दीपिकाने सुद्धा त्यावेळी आम्ही आमच्या आयुष्यात मूव्ह ऑन केलंय. आणि आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात फार खुश आहोत असे देखील ती म्हणाली.
दीपिका आणि रणबीर कपूर - दीपिका रणबीर कपूर जेव्हा वेगळे झालेत तेव्हा बरेच आरोप प्रत्यारोप झालेत. एका मुलाखतीत बोलताना रणबीरने याबाबत खुद्द कबूली दिली होती. दीपिकाने सुद्धा त्यावेळी आम्ही आमच्या आयुष्यात मूव्ह ऑन केलंय. आणि आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात फार खुश आहोत असे देखील ती म्हणाली.
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी - मै खिलाडी तू अनाडी या चित्रपटाने यांच्या लव्ह केमिस्ट्रीला वेगळं वळण दिलं.मात्र चित्रपटाच्या रिलीजदरम्यान एका मुलाखतीत माझी अक्षयने फसवणूक केल्याचा आरोप तिने जाहीरपणे अक्षयवर केला. या आरोपानंतर दोघांची मैत्री कायम राहील असे त्यावेळी कोणालाच वाटले नव्हते. मात्र ब्रेकअपनंतरही हे दोघे चांगले मित्र आहेत.
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी - मै खिलाडी तू अनाडी या चित्रपटाने यांच्या लव्ह केमिस्ट्रीला वेगळं वळण दिलं.मात्र चित्रपटाच्या रिलीजदरम्यान एका मुलाखतीत माझी अक्षयने फसवणूक केल्याचा आरोप तिने जाहीरपणे अक्षयवर केला. या आरोपानंतर दोघांची मैत्री कायम राहील असे त्यावेळी कोणालाच वाटले नव्हते. मात्र ब्रेकअपनंतरही हे दोघे चांगले मित्र आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com