शेतीत नुकसान अन् बॅंकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली.
Farmer's suicide
Farmer's suicideesakal

खिर्डी (जि. जळगाव) : रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली. भामलवाडी येथील रहिवासी विजय भाऊराव पाटील (४०, उर्फ श्रीराम पाटील) या शेतकऱ्यांने उष्णतेमुळे केळीचे झालेले नुकसान व फायनान्स व बँकेच्या कर्जाला कंटाळून गोठ्यातील छ्ताला दोरीच्या साहाय्याने दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची प्राथमिक माहिती गावचे पोलिस पाटील प्रमोद पाटील यांनी निभोंरा पोलिस स्टेशन येथे दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Farmer's suicide
विवाहाचे आमिष दाखवून वरपित्याची फसवणूक; वधूसह 2 जणांविरोधात गुन्हा
Farmer's suicide
व्‍यथा ज्‍येष्ठांच्‍या : पेन्‍शन र‍कमेतून औषध खरेदीही मुश्‍कील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com