Adhar Update: साडेचार लाख मुलांचे आधार अपडेट बाकी! बायोमेट्रिक पॅरामीटर्समध्ये होतात बदल; मोठ्यांचे आधार 10 वर्षांनंतर करा अपडेट

Jalgaon News : पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आधार कार्डमध्ये दोनदा बायोमेट्रिक बदल करावे लागतात.
Adhar Update
Adhar Updateesakal

जळगाव : आपल्यासाठी ‘आधार कार्ड’ आता उपयुक्त कागदपत्र बनले आहे. मुलांचे आधार कार्ड काढल्यानंतर पाच वर्षांनी, तर मोठ्यांचे आधार दहा वर्षांनंतर अपडेट करायला हवे. जिल्ह्यात साडेचार लाख मुलांचे आधारकार्ड अपडेट होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. (jalgaon Aadhaar update of four half lakh children pending marathi news)

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आधार कार्डमध्ये दोनदा बायोमेट्रिक बदल करावे लागतात. हे अपडेट वयाच्या पाचव्या वर्षी आणि पंधराव्या वर्षी केले जातात. हे अपडेट करणे अनिवार्य आहे. मोठ्या लोकांचे आधारकार्ड दहा वर्षांनंतर अपडेट करावे लागते. आधारकार्ड अपडेटसाठी निवास पत्ता पुरावा, वयाच्या पुराव्याची कागदपत्रे आवश्यक आहेत.

ज्या मुलांचे आधारकार्ड पाच वर्षांपूर्वी बनले आहे, त्यांचे बायोमेट्रिक्स म्हणजेच फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांची बाहुली विकसित झालेली नसते, म्हणून नावनोंदणीदरम्यान त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत, म्हणूनच युआयडीएआयने पाच वर्षांनंतर अपडेट करणे बंधनकारक केले आहे.

पहिल्याच वर्षी लहान मुलांचे आधारकार्ड काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, आधारकार्ड त्यांना पाच वर्षांनंतर अपडेट करावे लागते. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. त्याच्या बायोमेट्रिक पॅरामीटर्समध्य बदल केले जातात, म्हणूनच युआयडीएआयने पुन्हा वयाच्या १५ व्या वर्षी बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे आवश्यक केले आहे. (latest marathi news)

Adhar Update
BJP: "आपल्याच लोकांनी खंजीर खुपसला," गटबाजीने भाजपला पोखरले; पडद्यावरील रामानेही व्यक्त केली खदखद

महिला व बालविकास विभागांतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे. ही नोंदणी निःशुल्क आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कायमस्वरूपी एक आधार संच बसविला आहे.

त्या ठिकाणी नागरिकांना आधारकार्ड अद्ययावत करता येतील. आधारकार्ड अद्ययावत करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाईल. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी १९४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Adhar Update
Jalgaon News: मेमध्ये 51 महसूली मंडलात सलग 45 अंश तापमान! 51 मंडलातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार 43 हजारांची भरपाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com