.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
भडगाव : गिरणा धरणात सद्यःस्थितीत ५० टक्के पाणीसाठा झाल्याने गिरणाकाठाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर निकाली निघाला आहेच, शिवाय रब्बी हंगामाच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. यंदाच्या मोसमात धरणात आतापर्यंत तब्बल ४१ टक्क्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. (Girna Dam reaches fifty)