Jalgaon Political: मतदारांमध्ये ‘मोदी की गॅरंटी’चा विश्‍वास कायम : डॉ. केतकी पाटील; बूथ पातळीवरील नियोजनाने विजयाचा विश्‍वास

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीनिमित्त डॉ. केतकी यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेत काही गावांना भेटी दिल्या.
Dr Ketaki Patil
Dr Ketaki Patilesakal

Jalgaon Political : विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने त्यांचा प्रचार जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याकडे जात आहे. मात्र, केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामांवर, मोदींच्या गॅरंटीवर नागरिकांचा विश्‍वास कायम आहे. शिवाय, पक्षाचे बूथ पातळीवरील सूक्ष्म नियोजनाने रावेरसह जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केला. (Jalgaon Political lok sabha election 2024 Dr Ketaki Patil news)

लोकसभा निवडणुकीनिमित्त डॉ. केतकी यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेत काही गावांना भेटी दिल्या. विशेषत: रावेर मतदारसंघातील भुसावळ, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड व मलकापूर तालुक्यांत त्यांनी प्रचारफेरीत सहभागी होत मतदारांना आवाहन केले. प्रचारादरम्यान आलेले अनुभव त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना बोलून दाखविले.

प्रचारफेरींना प्रतिसाद

डॉ. केतकी म्हणाल्या, की रावेर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये प्रचारफेरीत सहभागी होता आले. प्रत्येक गावांत नागरिकांनी या फेऱ्यांचे स्वागत केले. ज्या गावातून प्रचारफेरी काढायची, त्याठिकाणचे नियोजन आदल्या दिवशीच करण्यात आले. वाढते उन्ह व तापमानामुळे सकाळी लवकर प्रचारफेरी काढत होतो.

स्थानिक प्रश्‍नही समोर

ही निवडणूक लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे. लोकसभेत निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची कामे वेगळी असतात, हे बहुतांश ग्रामीण भागातील मतदारांना ज्ञात नसते. त्यामुळे प्रचारफेऱ्यांमध्ये काहींनी गावांतील स्थानिक मुद्देही समोर आणलेत. मात्र, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, माजी जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती सदस्यांना सोबत नेल्यामुळे त्यांनी ग्रामस्थांनी या विषयाबद्दल मार्गदर्शन करून त्यांची समजूत काढली. (latest marathi news)

Dr Ketaki Patil
Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव, रावेर लोकसभेच्या मतदानाची जय्यत तयारी! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

मोदींच्या गॅरंटीवर विश्‍वास

ग्रामीण भागातील नागरिक, मतदारांची नेमकी भूमिका काय, या प्रश्‍नाबाबत डॉ. केतकी म्हणाल्या, की दहा वर्षे सत्ता राहिल्यानंतर खरेतर त्याविरोधात जनमत (ॲन्टीइन्कम्बन्सी) तयार होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ थेट प्रक्रियेतून अनेक नागरिकांना मिळाला आहे.

महिला, तरुणांसह सर्वच स्तरातील नागरिकांना या योजनांचा लाभ झालांय. ही निवडणूक राष्ट्रीय नेतृत्व, देशाचा नेता ठरविणारी असल्याने लोकांना पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान झालेले पाहायचे आहे. त्यांच्या गॅरंटीवर मतदारांना विश्‍वास असल्याचे त्या म्हणाल्या.

बूथरचना, मजबूत संघटन

एकूणच प्रचार यंत्रणा व मतदानप्रक्रियेबद्दल विचारले असता, डॉ. पाटील म्हणाल्या, की निवडणूक आल्यावर कामाला लागणे, ही भाजपची पद्धत नाही. पक्षाचे शिस्तबद्ध संघटन, बूथरचना मजबूत आहे. प्रत्येकाला दिलेली जबाबदारी कार्यकर्ता प्रामाणिकपणे पार पाडतो. हीच पक्षाची मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बळावर व मोदींच्या नेतृत्वावरील विश्‍वासावर आम्ही रावेर व जळगाव या दोन्ही जागा जिंकू, असा विश्‍वास डॉ. केतकी यांनी व्यक्त केला.

Dr Ketaki Patil
Priyanka Gandhi : भाजपची विचारधारा आदिवासींविरोधी : प्रियांका गांधी; पंतप्रधान मणिपुरातील आदिवासींवरील अत्याचारावर का बोलत नाहीत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com