temperature
sakal
जळगाव - जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून, सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर कायम आहे. तर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान देखील ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. जळगावसह भुसावळ, रावेर, पाचोरा, अमळनेर आदी ठिकाणी कडक उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहे.