Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात टँकरची वाटचाल शंभरीकडे! पाणीटंचाईची गावे 53 गावांवरून 69 वर

Jalgaon News : जिल्ह्यात जसजसा उन्हाचा कडाका वाढत आहे. तसतशी पाणीटंचाई गावांची संख्या वाढत आहे.
Crowd of citizens to fill water
Crowd of citizens to fill water esakal

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यातील तापमानाने ४३.३ अंश ओलांडले आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. २३ दिवसांत पाणीटंचाईची गावे ५३ वरून ६९ वर गेली आहेत, तर टँकरची संख्याही ६९ वरून ८९ वर पोचली आहे. मेअखेर टँकरची संख्या शंभर पार करेल, एवढी तीव्र पाणीटंचाईची भिती निर्माण झाली आहे. (Jalgaon Tanker moves to hundred in district news)

जिल्ह्यात जसजसा उन्हाचा कडाका वाढत आहे. तसतशी पाणीटंचाई गावांची संख्या वाढत आहे. २ एप्रिलला २९ गावांत ३३ टँकरने पाणीपुरवठा होत होता. ५ एप्रिलला त्यात वाढ होऊन टंचाईची गावे २९ वरून ४२ वर गेली, तर टँकरही ३३ वरून ५१ झाले. आता टंचाईग्रस्त गावांची संख्या ४२ वरून ५३ वर गेली. १४ एप्रिलला टँकर ५१ वरून ६९ वर (१८ टँकर) गेले. आता टंचाईग्रस्त गावे ५३ वरून ६९ (१६ गावे वाढली) पोचली आहेत. टँकरही ६९ वरून ८९ (२० वाढ) गेली आहेत.

२०२३ मध्ये ८४ टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा अधिक होतील. यामुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारी २०२४ पासूनच सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे आदेश दिले होते. यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात २ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

टँकर सुरू असलेली गावे अशी

तालुका--गावे--टँकर

जळगाव--५--७

जामनेर--५--५

धरणगाव--०--०

एरंडोल--०--०

भुसावळ--१--१

यावल--०--०

रावेर--०--०

मुक्ताईनगर--०--०

बोदवड--०--०

पाचोरा--०--०

चाळीसगाव-- ३२--४५

भडगाव--५--५

अमळनेर--१७--२२

पारोळा--४--४

चोपडा--०--०

एकूण--६९--८९

(Latest Marathi News)

Crowd of citizens to fill water
Water Crisis: जगातील २.२ अब्जांहून अधिक लोकसंख्येला पिण्याचे पाणी सहज उपलब्ध नाही; जाणून घ्या पाण्याचे वास्तव

१३० गावांसाठी १५० विहिरींचे अधिग्रहण

जामनेर तालुक्यातील १० गावांत १० विहिरींचे अधिग्रहण, धरणगाव तालुक्यातील १३ गावांत १५ विहिरी, एरंडोलमध्ये ६ गावांना सात विहिरी, भुसावळमधील दोन गावांत दोन विहिरी, रावेर व बोदवड तालुक्यांत प्रत्येकी एका गावात एक विहीर, मुक्ताईनगरला सात गावांत सात विहिरी, पाचोरा तालुक्यातील तीन गावांत तीन, चाळीसगाव तालुक्यातील ३८ गावांत ४७ विहिरी, भडगावमधील तीन गावांत तीन, अमळनेर तालुक्यातील ३१ गावांत ३७ विहिरी, पारोळ्यातील १२ गावांत १२, चोपडा तालुक्यांत ३ गावांत सहा विहिरी, अशा एकूण १३० गावांत १५० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावांची नावे अशी

-चाळीसगाव तालुका : विसापूर तांडा, अंधारी, करजगव, कृप्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्रह्मणशेवगे, घोडेगाव, हातगाव

भिल्ल वस्ती, पिंप्री बुद्रुक, प्र.दे., खराडी, डोणदिगर, तळेगाव, न्हावे, ढोमणे, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चत्रभुज तांडा, शेवरी, बिलाखेड, शिरसगाव, जुनपाणी, पिंपळवाड निकुंभ, तळोदे प्र.दे., चिंचगव्हाण, अभोणे तांडा, सुंदरनगर, नाईकनगर तांडा क्रमांक १.

-भडगाव तालुका : तळबंद तांडा, वसंतवाडी, आंचळगाव, मळगाव, वडगाव बुद्रुक.

-अमळनेर तालुका : तळवाडे, शिरसाळे बुद्रुक, निसडी, लोणपंचम, नगाव खुर्द, देवगाव देवळी, सबगव्हाण, भरवस, अंचलवाडी, आटाळे, पिंपळे खुर्द चिमणपुरी, डांगर बुद्रुक, नगाव बुद्रुक, आडी अनोरे, गलवाडे बुद्रुक, लोणचारम तांडा, पिंपळे बुद्रुक.

-पारोळा तालुका : खेडीढोक, हणुमंतखेडे, कन्हेर, चहुत्रे/वडगाव प्र.अ.

-भुसावळ तालुका : कंडारी.

-जामनेर : रोटवद, मोरगाव, काळखेडे, एकुलती बुद्रुक व एकुलती खुर्द.

-जळगाव तालुका : वराड, लोणवाडी बुद्रुक, सुभाषवाडी, शिरसोली, कुसुंबे खुर्द.

Crowd of citizens to fill water
Mumbai Water Crisis : गोराईत पाण्याचा ठणठणाट; पिण्याच्या पाण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका, आज सुनावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com