Mumbai Water Crisis : गोराईत पाण्याचा ठणठणाट; पिण्याच्या पाण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका, आज सुनावणी

वाढत्या उकाड्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष वाढले असून मुंबईतल्या गोराईत रहिवाशांना पाणी मिळेनासे झाले आहे.
Mumbai Water Crisis
Mumbai Water CrisisSakal

Mumbai News : वाढत्या उकाड्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष वाढले असून मुंबईतल्या गोराईत रहिवाशांना पाणी मिळेनासे झाले आहे. याप्रकरणी रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून पालिकेने सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (ता.८) सुनावणी होणार आहे.

बोरिवली पश्चिम येथील गोराई गावात रहिवाशांना अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडून पुरवठा केला जाणारे पाणी कमी दबावामुळे येत असून पाण्याअभावी रहिवाशांचे हाल होत आहेत. ५ हजार कुटुंबे या ठिकाणी राहत असून सुमारे २ हजार कुटुंबीयांकडे पाण्याचे नळ आहेत मात्र यातून पाणी येईनासे झाले आहे.

या प्रकरणी गोराई विलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगण्यात आले की,

या ठिकाणी विहिरी आहेत मात्र तेथील पाणी पिण्यास योग्य नाही उच्च न्यायालयाने पालिकेला जास्त दाबाने पाणी पुरवठा करण्यास सांगितले होते मात्र तसे होताना दिसत नाही त्यामुळे पालिकेने पाण्याची समस्या सोडवावी तसेच टँकरने पाणीपुरवठा करावा न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणावरील सुनावणी बुधवार पर्यंत तहकूब केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com