

Sakal
जळगाव : शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना यापुढे स्वतः ई-पीक पाहणी करावी लागणार नाही. गेल्या काही वर्षात ई-पीक पाहणी प्रक्रियेला मिळालेला अल्प प्रतिसाद आणि शेतकऱ्यांसमोरील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदापासून पीक नोंदणीची जबाबदारी नियुक्त सहायकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर ही मोहीम १५ जुलैपासून सुरू होणार आहे.