कजगाव:तितूर नदीला महीन्याभरात चौथा पुर,खरीप हंगाम पाण्याखाली

पुन्हा वीस ते पंचवीस गावाचा संपर्क तुटला असून पुलाचा कच्चा भराव वाहुन गेला आहे.
Titur River Flood
Titur River Flood

कजगाव ता भडगाव: येथील परिसरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतात पाणीच पाणी साचले असून संपूर्ण पिके पाण्याखाली (Titur River Flood) आली आहेत यामुळे पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांचा हाती आलेला घास हीरावला आहे. यावर्षीचा कापूस,मका ,ज्वारी आदी पिकांचा खरीप हंगाम (Crop Damage) वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे तरी शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

Titur River Flood
मुस्लीम कीर्तनकार हभप शेख महाराजांचे किर्तन सेवा देतांना निधन..

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून जोरदार पाऊस होत आहे. त्यात तितूर नदीला संपूर्ण सप्टेंबर महीन्यात चौथा पुर आला आहे. या पुरात कजगाव नागद रस्त्यावरील पुलावर पाणी वाहत असल्याने वाहतूक झाली आहे. पुन्हा वीस ते पंचवीस गावाचा संपर्क तुटला असून पुलाचा कच्चा भराव वाहुन गेला आहे.

तसेच परिसरातील बांबरूड,गोंडगाव ,कनाशी ,पिप्री या भागातील नाले तुडुंब पाण्याने भरून ओसांडून प्रवाहीत होत आहे आहेत. कनाशी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकीला अडचण निर्माण झाली आहे तसेच येथील गोंडगाव रस्त्यावरील ब्रिटीशकालीन नाल्यावर बेकायदेशीर बांधकामे झाल्यामुळे नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळे नाल्याचे पाणी येथील घरामध्ये शिरले होते यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com