वादळामुळे दोन हजार हेक्टरवरील केळी पिकांचे झाले नुकसान

पालकमंत्री या नुकसानग्रस्त गावातील पिकांची पाहणी करणार आहे
वादळामुळे दोन हजार हेक्टरवरील केळी पिकांचे झाले नुकसान


जळगाव : जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात गुरुवारी (ता. २७) सायंकाळी झालेल्या पाऊस (Rain) व वादळामुळे (Storm) २०४२ हेक्टवरील केळी पिकाचे (Banana crop) नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने (Department of Agriculture) शुक्रवारी (ता. २८) केली. तसा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांना सादर करण्यात आला.

(raver muktaeenger two thousand hectares banana crop storm damaged)

वादळामुळे दोन हजार हेक्टरवरील केळी पिकांचे झाले नुकसान
जळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा; तीन महिन्यात मृत्युची नोंद कमी

रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे एकूण दोन हजार 984 शेतकरी बाधित झाले असून गावांमध्ये 2042 हेक्टर वर नुकसान झाले आहे बहुतांशी नुकसान केळी पिकाचे आहे. रावेर तालुक्यात तेवीस गावांमध्ये 949 शेतकऱ्यांचे 757 हेक्टर वर नुकसान झाले आहे. तर मुक्ताईनगर तालुक्यात 31 गावातील दोन हजार पस्तीस शेतकऱ्यांचे 1285 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे असे एकूण दोन हजार 984 शेतकऱ्यांचे केळी पिकांचे 2042 हेक्टरवर नुकसान झाले आहे. दरम्यान उद्या पालकमंत्री गुलाबराव पाटील दुपारी तीन वाजता या नुकसानग्रस्त गावातील पिकांची पाहणी करणार आहे.



रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात प्राथमिक दोन हजार 42 हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. केळी पिकांचे मोठे नुकसान आहे.
-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com