Bhaji
sakal
जळगाव - पावसाळ्याच्या आगमनानंतर शहरातील खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेला नवसंजीवनी मिळाली असून भजी, वडे, समोसे, कचोरी, चहा आणि इतर गरम पदार्थांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. वातावरणातील गारवा आणि पावसाच्या सरींमुळे नागरिकांचा कल गरमागरम खाद्यपदार्थांकडे वाढल्याने शहरातील हॉटेल, टपऱ्या आणि खाद्यव्यावसायिकांच्या व्यवसायाला चांगली चालना मिळत आहे.