जळगाव : जिल्ह्यात पावसाने (Rain) आतापर्यंत लावलेल्या दमदार हजेरीने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात (irrigation project) ७९.४० टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे. वाघूरसह अन्य मध्यम ८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गिरणा प्रकल्पात ६८.४२ टक्के साठा आहे.
जिल्ह्यात सप्टेंबरअखेर परतीच्या प्रवासाला सुरवात होते. मात्र, अजूनही जिल्ह्यात काही दिवस काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाचा आहे. सुरवातीला हवामान विभागाने सरासरीनुसार अंदाज वर्तविला होता. जून पर्जन्यमान होणार असल्याचा जुलैच्या सुरवातीला मान्सूनने तब्बल १५ ते २० दिवसांचा खंड दिला. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. सरासरी पर्जन्यमानानुसार जून ते सप्टेंबरदरम्यान आतापर्यंत १०४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक चांगली आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पापैकी हतनूर प्रकल्पात गेल्या २४ तासांत ५५.२१ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली.
हतनूर प्रकल्पात ८०.५९ टक्के, तर गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ९ मिलिमीटर पावसासह ३.१३ दशली घनमीटर पाण्याची आवक झाली असून, प्रकल्पात ६८.४२ टक्के साठा आहे. वाघूर प्रकल्पासह अभोरा, मंगरूळ, सुकी, हिवरा, अग्नावती, तोंडापूर, बोरी आणि मन्याड आदी ९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. मोर ९२.७४, बहुळा ९९.८, अंजनी ८७.५६, गुळ ४७.९७, तर सर्वांत कमी भोकरबारीत १६.८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.