100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये : कृषी विभाग

शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे नुकसान सध्या पेरण्या करू नये, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिला आहे.
sowning
sowningesakal

जळगाव : जिल्ह्यात पावसाने जून महिन्यात ओढ दिली आहे. यामुळे आता पेरण्या केल्या, तर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे नुकसान टाळण्यासाठी शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिला आहे.

हवामान विभागाने लवकर पावसाचा अंदाज व्यक्त करूनही जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे पेरण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये. गेल्या रविवारी (ता. १९) शहरात चांगला पाऊस झाला. यामुळे जमिनीतील उष्णता निघण्यास मदत झाली. मात्र, पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही. २० जुलैपर्यंत खरिपाच्या पेरण्या होऊ शकतात. वाटल्यास शेतकऱ्यांनी इतर पिके घ्यावीत.

sowning
खरिपाच्या पेरण्या 97 हजार हेक्टरवर पूर्ण

जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापूस आहे. सर्वच शेतकऱ्यांचा कापूस लावण्यावर भर असतो. बागायतदार शेतकऱ्यांकडे पाणी असल्याने त्यांनी कापसाची पेरणी केली. मात्र, ज्यांची शेती कोरडवाहू आहे, अशांनी कापसाची लागवड चांगला पाऊस झाल्याशिवाय करू नये, अन्यथा बियाणे वाया जाण्याची भिती आहे.

आतापर्यंत झालेला पेरण्या अशा

- कापूस : ९३ हजार ६०० हेक्टर

- ऊस :२१ हजार हेक्टर

- मका : १८ हजार हेक्टर

एकूण : ९७ हजार हेक्टर

sowning
Jalgaon : महावितरणच्या डीपीतून हजारोंचा ऑइल चोरीला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com