
Jalgaon News | आधारकार्डाला 10 वर्षे झाली असल्यास अद्ययावत करा : जिल्हाधिकारी अमन मित्तल
जळगाव : केंद्र शासनाकडील १९ सप्टेंबर २०२२ च्या अधिसूचनेनुसार, ज्या व्यक्तींना आधारकार्ड काढून १० वर्षे पूर्ण झाली असल्यास त्यांनी आपले आधारकार्ड अद्ययावत करणे गरजेची असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली. ( Update Aadhaar card if 10 years old instructions of Collector Aman Mittal Jalgaon News)
केंद्र व राज्य शासनाच्या अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारचा वापर केला जात आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नवीनतम आणि अद्ययावत तपशिलासह आधार सादर करणे आवश्यक आहे.
ज्यांना आधारकार्ड काढून १० वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. परंतु अद्ययावत केले नसतील, उदाहरणार्थ पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या तपशीलात कोणताही बदल झालेला नाही, अशा रहिवाशांना आधार देणारी कागदपत्रे अपलोड करून त्यांचा पत्ता पुन्हा सत्यप्रत करणे आवश्यक आहे.
त्यानुसार आधारधारकांना या संदर्भात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉक्युमेंट अपडेट’ हे नवीन फीचर विकसित करण्यात आले आहे. नागरिक आधार अद्ययावत कोणत्याही आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन आधार अद्ययावत करू शकतात. जसे आपले सरकार सेवा केंद्र, सेंट्रल बँक, सीएससी सेंटर, बीएसएनएल कार्यालय या ठिकाणी अद्ययावत करू शकतील.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
महिला व बालविकास विभागांतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडी मध्ये करण्यात येत आहे. ही नोंदणी निःशुल्क आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कायमस्वरूपी एक आधार संच बसविण्यात आला आहे. त्या ठिकाणी नागरिकांना आधारकार्ड अद्ययावत करता येतील.
आधारकार्ड अद्ययावत करण्यासाठी शासनाकडील निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाईल. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले. अधिक माहितीकरिता १९४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.