वंचित विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणार; चर्चेनंतर कुलगुरुंचे आश्‍वासन

kbc north maharashtra university
kbc north maharashtra universityesakal

जळगाव : खानदेशात विशेषत: धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील अतिवृष्टीने अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत पोचू न शकल्याने ते परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी कुलगुरु डॉ.व्ही.एल. माहेश्‍वरी यांच्याशी चर्चा केली. या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा (Re Examination) घेण्याचे कुलगुरुंनी त्यांना सांगितले. (Vice Chancellor north maharashtra university statement about re examination Latest Marathi News)

गेल्या तीन दिवसांपासून खानदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यातही धुळे व नंदूरबार.जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली असल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदव्युत्तर व अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु असून गावांचा संपर्क तुटल्याने त्या गावांमधील अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत पोचू शकलेले नाहीत.

kbc north maharashtra university
Jalgaon : 2 हजारांवर रेल्वेचे जनरल तिकीट UTS APP डाउनलोड

याबाबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांना ही समस्या सांगितली. प्रा. पाटील यांनी यासंदर्भात कुलगुरु डॉ. माहेश्‍वरी यांच्याशी चर्चा करत वस्तुस्थिती विशद केली. त्यावर कुलगुरुंनी जे विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोचू शकले नाहीत, त्यांना त्या दिवसाचा संबंधित पेपर पुन्हा देण्याबाबत व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले, अशी माहिती दिलीप पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

kbc north maharashtra university
Jalgaon : कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांची केली सुटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com