
वंचित विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणार; चर्चेनंतर कुलगुरुंचे आश्वासन
जळगाव : खानदेशात विशेषत: धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील अतिवृष्टीने अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत पोचू न शकल्याने ते परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी कुलगुरु डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांच्याशी चर्चा केली. या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा (Re Examination) घेण्याचे कुलगुरुंनी त्यांना सांगितले. (Vice Chancellor north maharashtra university statement about re examination Latest Marathi News)
गेल्या तीन दिवसांपासून खानदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यातही धुळे व नंदूरबार.जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली असल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदव्युत्तर व अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु असून गावांचा संपर्क तुटल्याने त्या गावांमधील अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत पोचू शकलेले नाहीत.
हेही वाचा: Jalgaon : 2 हजारांवर रेल्वेचे जनरल तिकीट UTS APP डाउनलोड
याबाबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांना ही समस्या सांगितली. प्रा. पाटील यांनी यासंदर्भात कुलगुरु डॉ. माहेश्वरी यांच्याशी चर्चा करत वस्तुस्थिती विशद केली. त्यावर कुलगुरुंनी जे विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोचू शकले नाहीत, त्यांना त्या दिवसाचा संबंधित पेपर पुन्हा देण्याबाबत व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती दिलीप पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
हेही वाचा: Jalgaon : कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांची केली सुटका
Web Title: Vice Chancellor North Maharashtra University Statement About Re Examination Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..