शेततळ्यातील पाण्याने भागवली तहान...

लेंगरे - येथील अमृत निंबळकर यांनी दुष्काळग्रस्त लोकांची शेतातील अमृत कुंडांनी भागवली तहान.
लेंगरे - येथील अमृत निंबळकर यांनी दुष्काळग्रस्त लोकांची शेतातील अमृत कुंडांनी भागवली तहान.

अमृत निंबाळकर यांच्यामुळे लेंगरे गावातील पाण्याचा प्रश्‍न निकाली
लेंगरे - पाणी हे मानवाचे जीवन आहे. पाणी हे अमृतापेक्षाही महत्त्वाचे आहे. हे लेंगरेच्या अमृतराव निंबाळकरांनी दाखवून देत सामाजिक बांधलिकी  जपण्याचे काम त्यांनी केले. दुष्काळाने त्रस्त झालेल्या लोकांना आपल्या शेतातील तलावातील एक कोटी लिटरचा पाण्याचे अमृत कुंड खुले करून दिले आहे. ग्रामपंचायतीने शेततलावातील पाणीपुरवठ्याच्या  विहिरीत सोडल्याने नियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे लेंगरेकरांची पाण्यासाठी होणारी फरफट काहीशी थांबणार आहे. 

गावातील सुमारे ५ ते ६ हजार लोकांचे पाण्यासाठी होणारी लाहीलाही थांबणार आहे. त्यांनी गावासाठी केलेल्या कार्याचे कौतुक परिसरात होत आहे. भागात दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला मात्र   लेंगरेतील अमृतराव निंबाळकरांनी यावर मात करत पाणी साठ्यासाठी शेतातच शेतीच्या पाण्यासाठी दोन कोटी लिटर क्षमतेचा शेततलाव बांधला. या पाण्याचा त्यांनी पुरेपूर शेतीसाठी वापर करून शेतीचा विकास केला.  लेंगरे परिसरात सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे. गावाला ज्या ढोराळे तलावातून केला जात होता. त्यातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे लेंगरेकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. प्रशासनाकडून केवळ तीन पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून केला जाणारा पाणीपुरवठा पुरत नव्हता. 

या पाणीप्रश्नामुळे जनावरांच्या चारा टंचाई जाणवू लागली होती. ही सगळी लेंगरेकरांची परवड पाहून निंबाळकरांनी आपल्या शेतातील पाणी गावाला देऊन त्यांची तहान भागवण्याचे काम त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com