रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावात बुधवारी रात्री झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात स्वाराचा मृत्यू झाला. राजेश महादेव धुमक (वय ३४, रा. झरेवाडी-रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २७) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश धुमक व त्याची पत्नी ऋतुजा राजेश धुमक (वय ३०) व मुलगा साईश धुमक (वय ४) हे मुलाला दवाखान्यात उपचार करण्यासाठी रत्नागिरीत आले होते.
हातखंबा गावातील बस स्थानकाजवळ एक आरामबस उभी असताना मागून उतारावरून रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीस्वाराला उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघेही फेकले गेले तर दुचाकी ट्रकसोबत सुमारे दोनशे मीटर फरपटत गेली होती. या अपघातात दुचाकीस्वार राजेश धुमक यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले.
हातखंबा गावातील समाजिक कार्यकर्ते मुन्ना देसाई व तरुणांनी मदतकार्य केले. जखमींना जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज मोफत रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात येत असताना पाली ते नाणीज दरम्यान प्रवासात मुलगा साईश धुमक यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली होता. संशयित ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून अटक केली.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.