पाली - मुसळधार पावसामुळे गुरुवारी (ता. 19) येथील वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलाजवळ दोन्ही बाजूला रस्त्यावर सखल भागात पाणी भरल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद होती..तसेच या मार्गावर दापोडे गावाजवळ अंबा नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे येथील वाहतूक देखील बंद होती. तसेच भेरव येथील अंबा नदी पूल पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक देखील बंद होती. तसेच पाली रवाळजे मार्गावर नांदगाव येथील सरस्वती नदी पुलावरून पाणी गेले व वाहतूक ठप्प झाली.यामुळे सुधागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी कामासाठी निघालेले चाकरमानी, प्रवासी तसेच विद्यार्थी यांचे हाल झाले..सतत सुरु असलेल्या पावसामुळे पाली पोलीस ठाणे हद्दीतील अंबा नदीवरील पाली वाकण खोपोली मार्गावर उन्हेरे व पाली जवळ अंबा नदीची पातळी वाढली असल्या कारणाने पुलाच्या दोन्ही बाजूस मुख्य रोडवर पाणी भरले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूची वाहतूक बॅरेकेटींग च्या सहायने बंद करण्यात आली व योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला.त्याचप्रमाणे खुरावले फाटा येथील भेरव गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रोडवरील पुलावर देखील पाणी भरले असल्या कारणाने सदर ब्रिज वाहतुकी करिता बंद करण्यात आला. आणि योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला. सरस्वती नदीची पातळी वाढल्यामुळे नांदगाव येथील नुकताच झालेल्या पुलावरून देखील पाणी गेले. त्यामुळे पाली रवाळजे मार्गावर तेथील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली..पाली वाघजाई नगर येथील किल्ल्याच्या मातीचा भाग आला खालीपाली वाघजाई नगर येथील किल्ल्याच्या मातीचा भाग व दगड खाली आले. लागलीच खबरदारी घेत पाली नगरपंचायत च्या नगराध्यक्ष प्रणाली शेळके यांनी या ठिकाणी भेट दिली व नागरिकांना सुरक्षित व दक्ष राहण्याचे आवाहन केले. माती व दगड खाली आल्यामुळे येथील नागरिक भयभीत आहेत..पाली बस स्थानक गेले पाण्यातपाली बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अजून ठप्प आहे. जुने बस स्थानक इमारत तोडून तेथील राडाराडा स्थानकातच आहे. तसेच स्थानकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मुसळधार पावसामुळे गुरुवारी (ता. 19) स्थानकाच्या संपूर्ण आवारात पाणी भरले होते. त्यामुळे प्रवासी वाहन चालक व वाहकांची मोठी गैरसोय झाली..पूल झाला पण उपयोग शून्यअंबा नदीवर नुकताच उंच व रुंद असा मोठा पूल बांधण्यात आला आहे. या आधी अंबा नदीवरील जुना पूल हा अरुंद व उंचीने छोटा होता. तसेच क्षमता देखील कमी होती. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी जाऊन प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी व वाहतूक ठप्प होत होती..नवीन रुंद व उंच पूल बांधल्यामुळे ही समस्या संपुष्ठात येऊन पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहील, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला व प्रवाशांना होती. मात्र घडले भलतेच, नवीन मोठा व रुंद पूल झाला मात्र त्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता हा खाली असल्यामुळे आता पुलावरून पाणी न जाता या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पाणी साचते व वाहत आहे.आणि परिणामी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होत आहे. एमएसआरडीसी प्रशासनाने या दोन्ही बाजूला मोरी टाकणे किंवा उंच रस्ता करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्यामुळे हकनाक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे..खुश्कीचा मार्ग पण त्रासदायकवाकण पाली खोपोली राज्य महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी व वाहने याच मार्गावरून जातात. हा मार्ग सुस्थितीत असल्यामुळे अनेक प्रवासी व वाहने याचा वापर करतात. मात्र पाली अंबा नदी पूल झाला असूनही पुलाच्या दोन्ही सखल बाजूला पाणी साचल्यामुळे प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून पडतात व त्यांची गैरसोय होते..अंबा नदीवर मोठा व उंच पूल बांधला मात्र पावसाळ्यात आता पुलावरून पाणी जात नाही तर पूलाच्या दोन्ही बाजूकडे पाणी जाऊन मार्ग बंद होतो. यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.- संदीप दळवी, नागरिक, पाली.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.