Anuskura Ghat road repair funding Maharashtra
esakal
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील दळणवळणाच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेल्या अणुस्कुरा घाट मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामधून २५ किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण केले जाणार (Anuskura Ghat road repair funding Maharashtra) असून, पावसाळ्यापूर्वी डागडुजीचे काम पूर्ण केले जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या या मार्गाला आता नवसंजीवनी मिळणार आहे. यासाठी आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता.