

Newly opened Bavandi Bridge
sakal
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. या पुलावरून एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवास सुखकर झाला आहे. दोन्ही बाजूची वाहतूक सुरू होण्यासाठी जून महिना उजाडेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.