Pali Pig Farm
sakal
पाली - रायगड जिल्ह्यातील पशुपालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. पशुपालन व्यवसायाला आता 'कृषी'चा दर्जा देण्यात आला असून, यामुळे जिल्ह्यातील हजारो पशुपालकांना आता व्यावसायिक दराऐवजी सवलतीच्या कृषी दराने वीज उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे पशुपालकांचा उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.