रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. या एकवर्षात तिवरेतील ग्रामस्थांचे पुनर्वसन झालेले नाही. यावर भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला असून शिवसेनेच्या मंत्री, स्थानिक आमदार आणि खासदारांनी चुना जनतेला लावण्याचेच काम केल्याची टीका केली आहे.
तिवरे धरण दुर्घटनेत मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. संसार उध्वस्त झाले. 22 घरे, जनावरांचे गोठे वाहून गेले होते. 22 जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी एसआयटी नेमली आणि पुनर्वसन करण्याचे काम सुरू झाले. पण आज एक वर्षानंतरही शिवसेनेच्या आमदार आणि खासदारानि याकडे ढुंकूनही बघितले नाही.
इथल्या लोकांनां फक्त आश्वासने दिली. इथली 56 कुटुंब आज उघड्यावर पडली आहेत. त्यांना जिल्हा प्रशासनाने आधार दिला नाही. जिथे जागा दिली तिथे घरे बांधून दिली नाहीत. अहवालाचे काय झाले तेही समजू शकलेले नाही. या सर्व घडामोडीनंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी इथल्या लोकांच्या भावनेशी खेळणाऱ्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांवर रोष व्यक्त केला आहे.
त्यानी ट्विटरवर देखील आपला संताप व्यक्त केला . शिवसेनेचे आमदार, खासदार आणि 2 पालकमंत्री असूनसुद्धा तिवरे येथील कुटुंब गेली एक वर्ष कंटेनर मध्ये राहत आहेत. सिद्धिविनायक ट्रस्ट ने दिलेले 5 कोटी कुठे गेले माहिती नाही. घर गेलं, शेत गेलं आणि कुटुंबातील लोकांचे जीवही गेले. शिवसेनेच्या आमदार खासदारांना कुटुंब उध्वस्त झाली तरी चालतील पण गोड बोलायचं आणि चुना लावायचंच काम ते करणार, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.