रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या भडक्यात २५ एकर परिसरातील सुमारे १ हजार १२५ आंबा, काजूची कलमे खाक झाली. यामध्ये चार बागायतदारांचे सुमारे ४५ लाखांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या प्रयत्नाने काही तासांत ही आग आटोक्यात आणली. ३३ केव्ही मुख्य विद्युत वाहिनीमध्ये शॉर्टसर्किंट होऊन ही आग लागल्याचा अंदाज आहे.
काल दुपारी अचानक वणवा पेटला आणि काही क्षणात या वणव्याने रौद्ररूप धारण केले. सुमारे २५ एकर परिसरात हा वणवा पसरला आणि त्यात आंबा-काजूची झाडे भस्मसात झाली. ही आग या परिसरातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आली. राजेश तिवारी यांच्या बागेतून महावितरणची ३३ केव्हीची उच्च दाब वाहिनी गेली आहे. त्यातील तीन खांब यांच्या बागेत असून, त्यावर शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडून आग लागल्याचा अंदाज आहे. तसे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - विनामास्क लोकांवर कारवाईचा बडगा -
दरम्यान, महसूल विभागाकडून या बागांचे पंचनामे झाले असून, त्यामध्ये नुकसानीची नोंद करण्यात आली. प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे. मिरजोळे सरपंच संदीप नाचणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे. नुकसानीबाबत तातडीने तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या प्रयत्नाने पंचनामे झाले.
यांचे झाले नुकसान
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.