
गणेशोत्सवासाठी गावी जाताना दाम्पत्य बेपत्ता झाल्याची माहिती समोर आलीय. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर इथं शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे पत्नी आणि दोन मुलांसोबत गावी निघाले होते. पण चिपळूण नंतर त्यांच्याशी काहीच संपर्क झाला नाहीय. त्यामुळे कुटुंबिय चिंतेत आहे. ज्ञानेश्वर हे मूळचे हिंगोलीचे असून ते मंगळवारी गुहागरमधून निघाले होते. त्यांचं शेवटचं लोकेशन मंगळवारी सायंकाळी चिपळूण इथं आढळून आलं.